🕒 1 min read
मुंबई: आर्यन खान अमली पदार्थ प्रकरणातील पंच प्रभाकर साईलने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप केला आहे. यावरच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्वीटरला एक फोटो शेअर करत समीर यांच्या पहिल्या लग्नातील फोटो असल्याचा अप्रत्यक्ष दावा केला आणि घोटाळ्याची सुरुवात येथूनच झाली असल्याचा टोलाही त्यांनी लगावला होता. आता यावरच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून नवाब मलिक यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी हे प्रकरण सुरुवातीपासून लावून धरले आहे. लोकशाहीत तो त्यांचा अधिकार आहे, पण अशा वादग्रस्त प्रकरणावर टीका करताना संबंधित अधिकाऱ्याच्या व्यक्तिगत आयुष्याला मध्ये ओढू नये हेदेखील खरेच. कठोर टीका करायला काहीच हरकत नाही, पण ती कारवाईपुरतीच मर्यादित राहील हे पाहायला हवे. अर्थात केंद्रातील सत्ताधारी पक्षाला तरी कुठे काही भान राहिले आहे? तो केंद्रीय तपास यंत्रणांचा बेभानपणे वापर करीतच आहे. असे म्हणत त्यांनी केंद्रावरही ताशेरे ओढले आहे.
दरम्यान कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीची कारवाई भ्रष्ट असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. त्यातच आता NCB च्या अज्ञात अधिकाऱ्याकडून नवाब मलिकांना पत्र आले आहे. याबाबतीत मी लवकरच खुलासा करणार असल्याचे त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सोशल मीडियावर खेळ खेळत बसण्यापेक्षा पुरावे द्या’; क्रांतीचे मलिकांना प्रत्युत्तर
- ‘गृहमंत्री काश्मीरमध्ये असताना पाकिस्तानचा विजय आणि भारताचा पराभव साजरा’ संजय राऊतांचे टीकास्त्र
- नवाब मलिक लवकरच रिलीज करणार ‘स्पेशल २६’
- ‘ते’ प्रकरण हिमनगाचे एक टोक, मालक व नोकरांनी सावध राहावे; राऊतांचा इशारा
- गोव्यात प्रत्येक कामात भ्रष्टाचार; सत्यपाल मलिकांचा आरोप


