Share

‘गृहमंत्री काश्मीरमध्ये असताना पाकिस्तानचा विजय आणि भारताचा पराभव साजरा’ संजय राऊतांचे टीकास्त्र

Published On: 

मुंबई: टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानच्या संघानं १० गडी राखून भारतावर विजय मिळवला. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताननं भारताला प्रथमच नमवलं. त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानात जल्लोष साजरा झाला. मात्र यावेळी भारतातही काही ठिकाणी पाकिस्तानचा विजय साजरा करण्यात आला आहे. काश्मीरमध्ये फटाके फोडून पाकिस्तानचा विजय साजरा करण्यात आल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी या घटनेचा व्हिडीओदेखील ट्विट केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या काश्मीरमधील मुक्कामामुळे पाकिस्तान संघाचा T20 मधील विजय आणि भारताचा पराभव अशा प्रकारे साजरा होत असेल आणि भारतविरोधी घोषणा दिल्या जात असतील तर ही नक्कीच चिंतेची बाब आहे. केंद्र सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा. असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.

दरम्यान राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत रस्त्यावर सुरू असलेला जल्लोष दिसत आहे. काही जण हातात झेंडे घेऊन नाचत असून काही जण फटाके फोडून आनंद साजरा करत आहेत. यावरूनच त्यांनी केंद्र सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!