मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधत लोकसंख्या धोरण जाहीर केले. यामध्ये परिवार नियोजन करण्यासह अनेक योजना राबाविण्याचा विचार सुरू असून एक मुल झाल्यानंतर नसबंदी केल्यास त्यांना 20 वर्षापर्यंत मोफत आरोग्य सुविधा, शिक्षण, विमा, यासोबत शासकीय नोकरित प्राधान्य असे अनेक लाभ या लोकसंख्या धोरणाच्या माध्यमातून देणार असल्याचे या धोरणात म्हटले आहे.
तर तर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी देखील लोकसंख्या नियंत्रणासाठी मोठा निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यातच मध्ये प्रदेशातील भाजप खासदार सुधीर गुप्ता यांनी अनियंत्रीत लोकसंख्येसाठी बॉलिवूड अभिनेता आमिर खान याच्यासारखे लोक जबाबदार असल्याचं म्हटले आहे.
भाजप खासदार गुप्ता यांनी आमिर खानचे नाव घेत म्हटले आहे की, ‘देशाची लोकसंख्या अनियंत्रित कऱण्यासाठी आमिर खान सारख्या लोकांचा हात आहे, हेच दुर्दैव्य आहे. आमिर खान याला पहिल्या पत्नीकडून दोन आपत्य आहे. दुसरी किरण राव आता मुलाला घेऊन कुठं भटकणार, तिची त्याला चिंता नाही. मात्र आता आमिर तिसरीच्या शोधात आहे.’ असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- संभाजीराजेंची गादी श्रेष्ठ, त्यांनी भाजपच्या खासदारीला लाथ मारायला हवी- हर्षवर्धन जाधव
- मनगढत कहाण्या बनविण्याचं काम सुरू, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला – नाना पटोले
- हे राजपुत्रांनी राजपुत्रांसाठी चालवलेलं सरकार, भाजप आमदाराचा आरोप
- ‘नाना पटोलेंची भूमिका सरकारला सुरुंग लावणारी’ ; अजितदादांचा आक्रमक पवित्रा
- ‘काँग्रेसने ज्या शिवसेनेला पाळलं, त्यांच्या प्रमुखांनीच पाळत ठेवली हे किती वाईट!’; भाजप नेत्याची बोचरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

