🕒 1 min read
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या वक्तव्याचा कॉंग्रेसकडून राज्यभर निषेध केला जात आहे. आज कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर कॉंग्रेस आंदोलन छेडणार होते. मात्र त्यांच्या घराच्या गेटसमोरच पोलिसांनी त्यांना अडवले आहे. नाना पटोले आणि वारकरी संप्रदाय यांनी मिळून आंदोलन सुरु केले. मात्र हे आंदोलन तात्पुरते मागे (Congress withdraws agitation on Sagar Bungalow) घेतले असल्याची घोषणा नाना पटोले यांनी केली आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची बदनामी केली, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी महिलांचा अपमान केला, त्याबद्दल भाजपने एकदा सांगावे, की आम्ही चूक केली असून आम्ही त्याचे समर्थन करत नाही.”, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. तसेच मोदींनी महाराष्ट्राचा अवमान केला आहे. त्याचाच आम्ही निषेध करत आहोत. भाजपने त्यांच्या गुंडप्रवृत्तीच्या लोकांना रस्त्यावर उतरवलं. मुंबईकरांना अडचणीत आणण्याचं काम केलं. आम्ही तत्त्वाची लढाई लढत आहोत. आम्ही हे कदापी सहन करणार नाही. आजचं आंदोलन आम्ही थांबवलं असलं तरी भाजप खासदारांच्या घरासमोरील आमचं आंदोलन सुरूच ठेवणार आहोत, असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.
तसेच सध्या मुंबईकरांच्या अडचणी बघून आजचे आंदोलन कॉंग्रेस मागे घेत आहे, अशी घोषणा त्यांनी केली आहे. दरम्यान काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांना ‘सागर’ बंगल्याजवळून पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दुसरीकडे भाजप नेते राम कदम यांनी स्वतःच अपयश झाकण्यासाठी कॉंग्रेसची नौटंकी असल्याची टीका केली आहे. दरम्यान बाबुलनाथ परिसरातून भाजप कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Goa Assembly elections 2022 : मोदींच्या प्रमोद सावंत यांना शुभेच्छा; ११ वाजेपर्यंत २६.६३ टक्के मतदान
- IPL AUCTION 2022: आता राजस्थाचा नवीन संघ ‘हल्ला बोल’ करणार!
- Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी ‘या’ तारखेपासून करणार आमरण उपोषण, संभाजीराजे छत्रपतींची घोषणा
- सागर बंगल्यावर आंदोलन करणाऱ्या कॉंग्रेसचा ताफा पोलिसांनी अडवला; कार्यकर्त्यांची धरपकड
- IPL AUCTION 2022: आगामी हंगामासाठी ‘या’ संघासह होणार हैद्राबादचा सनराईस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
