🕒 1 min read
नांदेड : महाविकास आघाडीतील मंत्र्याच्या बलात्कार व इतर प्रकरणामुळे या सरकारची प्रतिमा दिवसेंदिवस मलीन होत चालली आहे. अशा प्रकारामुळे तीन पायाचे हे सरकार जास्त काळ टिकणार असे वाटत नाही. महाविकास आघाडीतून बाहेर पडणारा पहीला पक्ष हा काँग्रेस असेल. असे केंद्रीय सामाजीक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. नांदेड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्य सरकारमधील धनंजय मुंडे, संजय राठोड या मंत्र्याच्या प्रकरणांमुळे महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा मलीन होत आहे. तसेच पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात सखोल चौकशी होण्याची गरज आहे. अशी मागणी रामदास आठवले यांनी केली. परंतु अशा प्रकरणामुळे तीन पायांचे हे महाविकास आघाडी सरकार जास्त काळ टिकेल असे वाटत नाही. सत्तेत जर काँग्रेसला न्याय मिळत नसेल तर त्यांनी लगेच बाहेर पडावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
काँग्रेसनेही आता नाना पटोले यांच्यासारख्या आक्रमक नेत्याला प्रदेशाध्यक्ष केले आहे. ते कुणालाही भीक घालणारे नाहीत. यामुळे जर या सरकारमधून काँग्रेसच सर्वप्रथम बाहेर पडेल अशी भविष्यवाणीही रामदास आठवले यांनी केली. शिवसेनेचा वाघ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात अडकल्याने उद्धव ठाकरे हे सध्या मवाळ झाले आहेत. यामुळे त्यांना अनेक निर्णयांत त्यांना तडजोड करवी लागते. परंतु अजूनही वेळ गेली नाही, बॅक टू पॅव्हेलियन या, असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या
- फडणवीस सरकारच्या वृक्ष लागवड मोहिमेची चौकशी होणार, अजित पवारांची विधानसभेत घोषणा
- अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी संजय राठोड पुन्हा मंत्रीमंडळात येणार ?
- ६ मार्चला १०० दिवस पूर्ण करणाऱ्या शेतकरी आंदोलनावर बनणार चित्रपट
- दुचाकीचोर पोलीसांच्या जाळ्यात; तीन दुचाकी जप्त
- शेतकरी नुकसान भरपाई मुद्द्यावरुन भाजप आक्रमक, विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
