मुंबई : महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार असून 10 मार्चला अधिवेशनाची सांगता होईल. तिसऱ्या दिवशी भाजप नेते शेतकरी नुकसान भरपाई मुद्यावरुन आक्रमक झालेले पाहायला मिळाले. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा सामना रंगलाअसताना आता ‘फडणवीस सरकारच्या महत्त्वाकांक्षी 33 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेची विधिमंडळाच्या संयुक्त समितीतर्फे चौकशी करण्यात येणार’, अशी घोषणा करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार दणका दिला आहे. अर्थसंकल्पयीय अधिवेशनाच्या आज तिसऱ्या दिवसाची सुरूवात भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या खडाजंगीने सुरुवात झाली.
फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या ३३ कोटी वृक्ष लागवडीत भ्रष्टाचार झाला होता का यांची चौकशी करण्यासाठी विधिमंडळाच्या समितीची स्थापन करावी अशी मागणी केल्यानंतर फडणवीसांना मिरची का लागली?
– प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोले pic.twitter.com/gNxd5RirBy— Maharashtra Congress (@INCMaharashtra) March 3, 2021
‘फडणवीस सरकारच्या काळातील 33 कोटी वृक्षारोपण करण्यात आले होते. राज्यात वर्ष 2016 ते 2017 आणि 2019-20 या कालावधीत वन विभागाने वृक्ष लागवड योजनेत 28.27 कोटी वृक्ष लागवड करण्यात आली. ऑक्टोबर 2020 अखेरीस त्यातील 75.63% रोपे म्हणजे २१ कोटी जिवंत आहेत,त्याची देखभाल करण्यात येत आहे. 2017 ते 2019 कालावधीत वन विभागाने शासकीय यंत्रणा ,शैक्षणिक संस्था,उद्योगसमूह ,खासगी व्यक्ती यांच्या माध्यमातून 50 कोटी वृक्ष लावण्याची मोहीम राबाबण्यात आली होती. ही मोहिम राबवण्यासाठी २०१६-१७ते २०१९-२० दरम्यान २४२९.७८ कोटी निधी मिळाला होता तो पूर्व वापरण्यात आला. २५ टक्के रोपं जिवंत का राहिली नाही याची चौकशी केली जाईल, अशी मागणी मंत्री दत्ताराय भारणे यांनी केली. त्यानंतर या प्रकरणाची विधिमंडळाची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- ६ मार्चला १०० दिवस पूर्ण करणाऱ्या शेतकरी आंदोलनावर बनणार चित्रपट
- दुचाकीचोर पोलीसांच्या जाळ्यात; तीन दुचाकी जप्त
- शेतकरी नुकसान भरपाई मुद्द्यावरुन भाजप आक्रमक, विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन
- क्यूआर कोड स्कॅन करताय? थांबा आधी हे वाचा
- संजय राठोडांचा राजीनामा राज्यपालांकडे न पाठवता मातोश्रीत फ्रेम करून ठेवला आहे का?


