🕒 1 min read
नवी दिल्ली : ७ फेब्रुवारी रोजी लोकसभेत बोलत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी काँग्रेसवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच काँग्रेस नेत्यांनी देशभर कोरोना पसरवला असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले. मोदींच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, आजपासून(१० फेब्रु.)पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांना सुरुवात होत असून याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे.
लोकसभेत केलेल्या वक्तव्यासंदर्भात विचारण्यात आले असता मोदी म्हणाले की,‘लॉकडाऊन लागल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने देखील स्पष्ट केले होते की जो जिथे आहे, त्याने तिथेच थांबायला हवे. काही राज्यांनी त्यापूर्वीच लॉकडाऊन सुरू केले होते. परंतु काँग्रेसने मोफत तिकीट देऊन लोकांना जाण्यासाठी प्रोत्साहित केले. जर त्यावेळी काँग्रेसने असे केले नसते, तर श्रमिकांना काय घडतंय याचा अंदाज काही दिवसांत आला असता’, असे मोदी म्हणाले.
दरम्यान, लॉकडाऊनमध्ये जेव्हा संपूर्ण देश टाळेबंदीचे पालन करत होता. त्यावेळी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर उभे राहून नागरिकांना स्थलांतरित होण्यासाठी प्रवृत्त करत होते. तसेच काँग्रेस नेत्यांनी देशभर कोरोना पसरवला, असे मोदी लोकसभेच्या भाषणावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
-
मनपा आयुक्तांवर शाई फेकल्याप्रकरणी आमदार रवी राणांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा
-
“सध्याच्या महागाईसाठीही मोदी सरकार नेहरू-गांधी आणि काँग्रेसकडे बोट दाखविणार का?”
-
UP Assembly Election 2022 : पहिल्या टप्प्यातील मतदानास सुरुवात
-
राहुल गांधींच्या टीकेवर पंतप्रधान मोदींचे प्रत्युत्तर; म्हणाले,‘जे सभागृहात बसतच…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
