🕒 1 min read
नवी दिल्ली: भारताने १०० कोटी लसीकरण करत ऐतिहासिक विक्रम केला आहे. यावरून जगभरात देशाचे कौतुक केले गेले. अशात आत कॉंग्रेसने एक मागणी मोदी सरकारकडे केली आहे. १०० कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे अभिनंदन केले असले तरी कोरोनामुळे जीव गमावलेल्या ४.५३ लाख लोकांच्या कुटुंबीयांना माफीनामा लिहून द्या. अशी मागणी काँग्रेस नेते प्रहार वल्लभ यांनी केली आहे.
तसेच जगभरात ५० कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले भारत व चीन हे फक्त दोन देश आहेत. भारताने पहिल्यांदा १०० कोटींचे लक्ष्य गाठल्याची माहितीही चुकीची असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे मोदींनी चुकीची माहिती देऊन कौतुकाची थाप थोपटून घेऊ नये, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
दरम्यान निवडणूक रोख्यांतून मिळणाऱ्या पैशातून भाजपने लसीकरण मोहीम चालवावी, इंधनावरील करवाढ करून २३ लाख कोटी रुपये केंद्राने मिळवले असून त्यापैकी फक्त २ टक्के म्हणजे ३५ हजार कोटी लसीकरणावर खर्च केले गेले असल्याचा आरोपही
प्रहार वल्लभ यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री सावरकरवादीच, कोणी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर…- संजय राऊत
- २०२० मध्ये पाठवली नोटिस; अन २०२१ मध्ये पाडले दिवाण देवडीतील ते ‘अनधिकृत’ बांधकाम!
- सोशल मीडियावरील काँग्रेसचे समर्थक दहा पट वाढवायचे आहे-मुत्तेमवार
- ‘४७ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या नव्हे, त्या हत्याच!’
- ‘आयुक्त पांडेय यांच्या बेकायदेशीर घरांवर बुलडोझर चालवण्याच्या निर्णयास तत्काळ स्थगिती द्या’, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

