नांदुरा : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर घातलेली बंदी तात्काळ मागे घ्यावी, या मागणीसाठी नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले आहे. यावेळी केंद्र सरकारविरोधात निदर्शने करून सरकारचा निषेध करण्यात आला. केंद्र सरकारने कांद्याचे दर अवाक्यात राहावेत, यासाठी निर्यातबंदी जाहीर केली आहे.
या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याएवजी कमी दराने कांदा विकावा लागेल. एकीकडे कोरोनामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक फटका बसण्याची भीती आहे. शेतकरीविरोधी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली असल्याने संपूर्ण देशातील व राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मध्य सरकार प्रती तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
शेतकरी विरोधातील अन्यायग्रस्त निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी आज नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच निवेदन देण्यात आले.
यावेळी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस नीलेश पाऊलझगडे, नांदुरा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भगवान धांडे, केशव मापारी, पुरुषोत्तम झाल्टे अतुल, आशा गोंड, सुनीता देशमुख, सुनीता गोंड, मानसी देशमुख, संदीप बोचरे, नंदू गोंड, बंटी पाटील, राजू हाडे, ज्ञानेश्वर डांबरे, विनल मिरगे, सागर काटे, विनोद आढाव, राजू हिवाळे, शंकर बोदडे, शुभम लांडे, गजानन पाटील, वाल्मीक मुकुंद, शालिग्राम तांगडे, शुभम ढवळे, अतुल तांदळे, रमेश कांडेलकर, नारायण कांडेलकर, उत्तम कांडेलकर, सोपान वक्ते, नवृत्ती हिंगणकर, रामेश्वर बघे, विजय ढोले, कैलास नामगे, नारायण झाल्टे उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:-
- अभिनेत्रीने अनुराग कश्यपवर केले शोषणाचे आरोप; थेट मोदींना मागितली ‘ही’ मदत
- हिवाळी अधिवेशन रद्द करावे आणि अधिवेशनावर होणारा खर्च विदर्भातील वैद्यकीय यंत्रणा सक्षम करण्यासाठी द्यावा, कोणाची आहे ही मागणी ?
- सुप्रिया सुळे आणि ठाकरे पितापुत्रांच्या अडचणीत वाढ, निवडणूक प्रतिज्ञापत्रांची फेरपडताळणी होणार ?
- पोलीस अचानक ठाकरे सरकार पाडण्याइतके सक्षम कसे झाले ?, भाजप नेत्याचा प्रहार
- गृहमंत्र्यांना हे बोलणं शोभत नाही ; प्रवीण दरेकरांचा घणाघात


