मुंबई – राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं सरकारची चिंताही वाढली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव कमी करण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्याची शक्यता आहे. यात रुग्णांना ऑक्सिजन बेड्स, रेमडेसिवीर इंजेक्शन यांचा तुटवडा जाणवत असल्यानं आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
सत्ताधारी आणि विरोधक आरोप-प्रत्यारोप करण्यात दंग असताना काँग्रेसचे आमदार आशिष देशमुख यांनी ठाकरे सरकारकडून कोरोनाला रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर टीका करत घरचा आहेर दिला आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून करण्यात येणारे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे सांगत आशिष देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्रामधून आशिष देशमुख यांनी राज्यात आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी लावण्याची मागणी केली आहे.
राज्यात आरोग्य व आर्थिक आणिबाणी लागू करा कॅाग्रेस आमदाराचे पंतप्रधान मोदीना पत्र. राज्यातल @OfficeofUT सरकार पूर्ण अपयशी असल्याच आता कॅाग्रेससुध्दा बोलू लागली आहे. राज्याला ना धोरण ना दिशा ही आजची अवस्था आता सत्ताधारी कबूल करू लागले आहेत. https://t.co/D8uvJRvUGd
— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 21, 2021
याच मुद्द्यावरून भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. आपल्या ट्वीटमध्ये उपाध्ये म्हणाले की, राज्यात आरोग्य आणि आर्थिक आणिबाणी लागू करा, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेस आमदार आशिष देशमुख यांनी पंतप्रधान मोदीना लिहिले आहे. राज्यातले उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पूर्ण अपयशी ठरल्याचे आता कॉग्रेससुद्धा बोलू लागली आहे. राज्याला ना धोरण ना दिशा ही आजची अवस्था आहे. हे आता आता सत्ताधारीह कबूल करू लागले आहेत, असे केशव उपाध्ये म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- भोरमधील तीनशे वर्षांची परंपरा खंडीत, श्रीराम जन्मोत्सव सलग दुसऱ्यांदा रद्द
- राज्यात आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी लावा, काँग्रेसच्या आमदाराचे मोदींना पत्र
- ‘नवाब भाई… राष्ट्रवादीच्या आमदारांनीही रेमडीसीवरचा पुरवठा केला,हा औषधांचा साठा कुठून आला?’
- शरद पवार पुन्हा रुग्णालयात,शस्त्रक्रियेनंतर आता प्रकृती स्थिर
- कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला ५ लाख रुपयांची मदत जाहीर करा – रयत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

