Share

भाजपला कडवं आव्हान देण्यासाठी काँग्रेस हायकमांडने पृथ्वीराज चव्हाणांवर सोपवली ‘ही’ जबाबदारी !

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : २०१४ नंतर केंद्रासह अनेक राज्यातील सत्ता काँग्रेसने गमावली. मात्र, २०१९ विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात झालेल्या राजकीय उलथा पालथेनंतर महाराष्ट्रातील सत्तेत काँग्रेस सहभागी झाला. आता, काँग्रेसने पुन्हा गतवैभव प्राप्त करण्यासाठी मोर्चे बांधणी सुरु केली आहे.

निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी (केंद्र शासित प्रदेश) आदी राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. यामुळे काँग्रेसने कंबर कसली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे राज्यातील राजकीय वजन कमी झाल्याच्या चर्चा सुरु होत्या. पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस हायकमांडच्या जवळचे नेते मानले जातात, त्यामुळे त्यांना कोणती महत्वाची जबाबदारी देऊन पुन्हा सक्रिय करून घेता येईल यासाठी चाचपण्या सुरु होत्या.

आसामच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चव्हाणांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांना आसामच्या स्क्रिनिंग कमिटीचे अध्यक्ष बनवले आहे. त्यामुळे ते भाजपला कडवी टक्कर देणार का ? हे येत्या काळातच समजेल. विशेष म्हणजे ज्या २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेस मधील संघठनावर नाराजी व्यक्त करत बदल करण्याची मागणी केली होती, त्यात पृथ्वीराज चव्हाण यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे आता काँग्रेसमधील अंतर्गत वाद चिघळण्याची शक्यता आहे.

आसामची निवडणूक कधी ?

आसामची निवडणूक 3 टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्याचं मतदान 27 मार्चला होईल. दुसऱ्या टप्प्याचे मतदान 1 एप्रिल तर तिसऱ्या टप्प्याचं मतदान 6 एप्रिलला होईल.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!