🕒 1 min read
मुंबई : मागील काही काळापासून राज्यपालनाकडून केल्या जाणाऱ्या १२ आमदारांच्या नियुक्त्या होत नसल्याने मराठवाड्याचा विकासच काय संबंध असा सवाल भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं हे विधान दुर्दैवी आहे. असा हल्लाबोल माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. त्याच बरोबर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये राजकारण सुरु झाले आहे. पहिल्याच दिवशी विरोधकांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवत. वैधानिक विकास मंडळचा विषय काढत सरकारला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला. वैधानिक विकास महामंडळाच्या नियुक्तीवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं.
त्यावेळी अजित पवार म्हणाले, राज्यपाल विधानपरिषदेच्या १२ आमदारांची नावं जाहीर करतील त्यावेळेस विकास मंडळांची घोषणा करु. अजित पवारांच्या या विधानावरुन मोठा गदारोळ उडाला. त्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी दादांचं पोटातले ओठात आले, १२ आमदारांसाठी मराठवाडा, विदर्भातले लोकं ओलीस ठेवले का? असा सवाल करत त्यांचा वर हल्ला चढवला.
आता पंकजा मुंडे यांनीही अजित पवारांना घेऱ्यात घेण्याचा प्रयत्न केला. “वैधानिक विकास महामंडळ किंवा मराठवाड्याचा विकास आणि 12 आमदारांच्या निवडीचा संबंध काय? असा थेट सवाल करत त्यांनी अजित पवारांचं वक्तव्य दुर्दैवी आहे. कुठल्या राजकीय बुद्धीने काम करत आहेत कळतच नाही. हे सरकार राजकीय सूडबुद्धीने काम करीत असल्याचे त्यांनी आरोप लावले.
महत्त्वाच्या बातम्या
- अर्ध्यावरती डाव मोडला.. कारच्या धडकेत पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर
- ‘१२ आमदारांसाठी विदर्भ-मराठवाड्याला तुम्ही ओलीस ठेवले’
- बीडच्या सात माजी आमदारांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत
- दरवाढीविरोधात ‘शेणाच्या गोवऱ्यावर स्वयंपाक’ आंदोलन
- ‘युवकांनो, स्वच्छ राजकारणासाठी ‘वंचित’मध्ये सक्रिय व्हा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

