नवी दिल्ली : भाजप नेते तथा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देशात इंदिरा गांधींनी लागू केलेल्या आणीबाणीच्या घटनेला ४६ वर्षे झाल्याच्या निमित्ताने काँग्रेसवर टीका केली आहे. देशात २५ जून १९७५ रोजी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली होती. ही आणीबाणी जवळपास २१ महिने म्हणजेच २१ मार्च १९७७ पर्यंत लागू होती.
केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा ट्विटमध्ये म्हटले आहे की, १९७५ च्या या दिवशी कॉंग्रेसने सत्तेच्या स्वार्थापोटी आणि अहंकाराने देशावर आणीबाणी लादून जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची हत्या केली होती.
ते म्हणाले, ‘असंख्य सत्याग्रह्यांना तुरूंगात टाकण्यात आले आणि प्रेस देखील बंद केले गेले. नागरिकांचे मूलभूत हक्क काढून घेऊन संसद आणि कोर्टाला निःशब्द प्रेक्षक बनविले. एका कुटुंबाच्या विरोधात उठणारा आवाज शांत करण्यासाठी लावण्यात आलेली आणीबाणी हा स्वतंत्र भारताच्या इतिहासाचा एक गडद अध्याय आहे. २१ महिने निर्दय शासनाचे क्रौर अत्याचार सहन करत देशाच्या संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी अविरत लढा देणाऱ्या सर्व देशवासियांच्या त्याग आणि बलिदानाला सलाम.’
एक परिवार के विरोध में उठने वाले स्वरों को कुचलने के लिए थोपा गया आपातकाल आजाद भारत के इतिहास का एक काला अध्याय है।
21 महीनों तक निर्दयी शासन की क्रूर यातनाएं सहते हुए देश के संविधान व लोकतंत्र की रक्षा के लिए निरंतर संघर्ष करने वाले सभी देशवासियों के त्याग व बलिदान को नमन।
— Amit Shah (@AmitShah) June 25, 2021
काँग्रेसकडून राजकीय स्वार्थासाठी आणीबाणी
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी म्हटलं की, १९७५ मध्ये आजच्याच दिवशी काँग्रेसनं राजकीय स्वार्थासाठी आणीबाणीची घोषणा केली होती. भारताच्या महान लोकशाहीवरचा हा काळा डाग आहे. आणीबाणीला विरोध करणाऱ्या सर्व महान लोकांना प्रणाम. अत्याचार सहन केला पण त्यांनी लोकशाहीची मूल्ये जपली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तो काळा दिवस विसरता येणार नाही’, आणीबाणीवरून मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
- ‘नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली!’
- कबीर बेदींनी मुलाच्या आत्महत्यानंतर व्यक्त केलं दुःख
- ‘जर झेपत नसेल तर राजीनामा द्या’, सुप्रिया सुळेंनी महापौरांना सुनावले
- इतर पक्षातील नेते आपल्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा सर्वपक्षीय नेते का करत आहेत ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

