🕒 1 min read
औरंगाबाद : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज देशभरात ठिकठिकाणी काँग्रेसकडून आंदोलन सुरु आहे. मुंबईमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नाना पटोले यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीने देखील या घटनेचा निषेध करीत जोरदार आंदोलन केेले. यावेळी युवक काँग्रेस आणि महिला आघाडीचाही आंदोलनात मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये तीन कृषी विरोधी कायदे रद्द करा या मागणीसाठी शेतकरी बांधव आंदोलन करत होते. कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडल्याची घटना त्याठिकाणी घडली. यात चार शेतकऱ्यांसह ८ जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे तिकोना भवानीपूर दौऱ्यावर असताना ही घटना घडली. त्यानंतर बिगर भाजपाशासित राज्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर विरोधकांनी या प्रकरणी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या निषेधार्थ सोमवारी क्रांती चौक येथे काळी पट्टी बांधुन दोन तास ठिय्या देण्यात आल्या.
औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीने देखील या घटनेचा निषेध करीत जोरदार आंदोलन केेले. लखीमपूर गावामध्ये झालेल्या शेतकरी हत्या झालेल्या पिडीत कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असतांना प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारचा औरंगाबाद काँग्रेसच्या वतीने आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शहर अध्यक्ष हिशाम उस्मानी, प्रकाश मुगदिया, अनिल पटेल, मुजफ्फर खान पठान आदि उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- नर्सिंग ‘एएनएम’ अभ्यासक्रमांची उद्यापासून परीक्षा; मराठवाड्यातील २० केंद्रावर बैठक व्यवस्था
- ‘ही नौटंकी असली तरी मोदींनी यांना कुठून कुठपर्यंत आणले आहे’, राणे यांची बोचरी टीका
- येऊ कशी तशी मी..’फेम अन्विताचा ट्रेंडिग गाण्यावरचा दिलखेच ‘ठूमका’
- शेतकऱ्यांची चेष्टा केल्याप्रकरणी मंत्रिमंडळातून वडेट्टीवार यांची हकालपट्टी करा- लोणीकर
- ‘साहेब, आमची दिवाळी गोड करा; शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून मन सुन्न झाले’, फडणवीसांच्या भावना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
