औरंगाबाद : इयत्ता १ ते ८ पर्यंतच्या शालेय विद्याथ्र्यांना शिक्षण विभागाकडून दिडशे रुपयांसाठी हजार रुपयांचे बँक खाते सक्तीचे केले आहे. उन्हाळी सुट्टीतील शालेय पोषण आहार विद्याथ्र्यांना प्रत्यक्ष वितरित न करता त्याऐवजी आहाराचे अनुदान थेट विद्याथ्र्यांचा बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे केवळ शंभर रुपयांच्या अनुदानासाठी विद्याथ्र्यांना हजार रुपयांचे बँक खाते उघडावे लागेल. हा निर्णय पालकांना परवडणारा नसल्याने आता याचा विरोध होत आहे.
शालेय विद्याथ्र्यांना २०२१ च्या उन्हाळी सुट्टीतील धान्य वाटपाची रक्कम थेट विद्याथ्र्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे परिपत्रक प्राथमिक शिक्षण संचालकांकडून नुकतेच जारी करण्यात आले आहे. विविध शासकीय योजना व शिष्यवृत्ती घेणाऱ्या विद्याथ्र्यांचे बँक खाते आहे. परंतु हे प्रमाण फार अत्यल्प असल्यामुळे अनेक विद्याथ्र्यांना नवे बँक खाते उघडावे लागेल. सुट्टीतील ३५ दिवसांचे अनुदान पाहिली ते पाचवीच्या विद्याथ्र्यांकरिता १५६ रुपये तर सहावी ते आठवीच्या विद्याथ्र्यांकरिता २३४ रुपये ठरणार आहे.
कोरोना संकटामुळे अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतांना, अशा परिस्थितीत शासनाने हा निर्णय घेतला असल्याने पालकांच्यासुद्धा चिंता वाढल्या आहेत. त्यामुळे किमान दीडशे रुपयांच्या निधीसाठी एक हजार रुपये भरून बँक खाते उघडणे अनेक पालकांना परवडणारे नसून हा निर्णय शासनाने रद्द करावा, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी ताब्यात घेणे हा तमाम वारकऱ्यांचा अपमान’
- बीडमध्ये उद्या मराठा आरक्षण जनसंवाद; छत्रपती संभाजीराजेंची उपस्थिती
- ‘राज्यपालांच्या सगळं लक्षात आहे, फक्त ते आमदारांच्या यादीचे विसरलेत’, ‘त्या’ पत्रावरून राऊतांचा टोला
- ‘राजभवनचे अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही’
- ‘राजकीय उद्देशातून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले’, नवाब मलिकांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

