Share

‘मुख्यमंत्र्यांना घरातच बसून राहायचे आहे त्यामुळे ते निर्बंध उठवत नाहीत’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषेद घेवून ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयांची माहिती दिली. सध्या महाराष्ट्रावर तिसऱ्या लाटेचे संकट आहे. त्यामुळे राज्यात कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाही. जे नियम सध्या लागून आहे ते तसेच राहणार आहे, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे.

त्यावर आता विरोधकांनी मात्र चांगलीच टीकेची झोड उठवली आहे. यावरूनच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला इशारा देत म्हटले आहे की, ‘सरकारने जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये वेठीस धरू नये. रुग्णसंख्या कमी झाली आहे. मग जनतेला वेठीस का धरता? निर्बंध का उठवत नाही? असा प्रश्न माध्यमांशी बोलताना संदीप देशपांडेंनी विचारला आहे.

हा विषय आक्रमक होण्याचा नाही, याचे परिणाम सरकारला भोगावेच लागणार. आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिले की रेल्वे सुरू करा, पण त्यांना घरातच बसून राहायचे आहे, अशी टीकाही देशपांडेंनी केली. तसेच ‘ज्यांच्या दोन लसी झाल्या त्यांना निर्बंधातून बाहेर काढा ही आमची मागणी आहे. लसीकरण झाले तरीही निर्बंध असतील, तर लसीकरणाचा उपयोग काय? या सरकारने काय कामे केली? शाळेच्या शुल्काचा प्रश्न आहे, व्यापारी नाराज आहेत, हे वसुली सरकार हफ्तेखेरी करते आहे असा आरोप त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!