Share

वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून आषाढीला पंढरपूरला जाणार : मुख्यमंत्री ठाकरे

Published On: 

मुंबई  – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आषाढी एकादशीला भाविकांना पंढरीत येण्यास प्रशासनाने बंदी घातली असली तरी समस्त वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी पंढरपूरला जाणार, असं  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेला संबोधित करताना सांगितले आहे.

कोरोनामुळे यंदा महत्वाचे पालखी सोहळेही रद्द करण्यात आले असून या मानाच्या पालख्या आता एसटी बसने फक्त वीस जणांसह पंढरपूरात आणण्यास परवानगी देण्यात आली आहे. कालच गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांच्यासह विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली होती.

ठाकरे म्हणाले की, शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन यंदाची आषाढी वारी ही घरी राहूनच मनाने साजरा करण्याचा निर्णय घेऊन कोरोना विरोधातील लढाईत योगदान दिल्याबद्दल समस्त वारकऱ्यांचे आभारी असल्याचे म्हंटले आहे. तसेच आषाढी एकादशीला मी विठ्ठलाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण जगातील कोरोनाचे संकट दूर करावं, असे साकडं घालणार असल्याची माहितीही ठाकरे यांनी दिली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!