मुंबई: शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच जनतेसमोर लाईव्ह आले, नगरविकास खात्याची आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठक पार पडली. मात्र विधिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थित असल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर विरोधकांनी चांगलीच टीका केली होती. प्रमुख नसेल तर राज्य कसं चालणार, अशा शब्दात भाजप नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दणवे यांनी टीका केली होती.
शस्त्रक्रियेनंतर मात्र उद्धव ठाकरे यांनी नगरविकास खात्याच्या बैठकीला ऑनलाईन उपस्थिती लावली. या बैठकीत मुंबईकरांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईकर म्हटले की मुंबईकरांनी फक्त करच भरायचे का? मुंबईकर आधीच कर एवढा कर देत आहेत, त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुखांनी मुंबईवर जे प्रेम केले तेच प्रेम आम्ही पुढे नेत आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मालमत्ता करा बद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. ५०० चौरसफुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करत असल्याची मोठी घोषणा ठाकरेंनी केली. ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करात माफी दिल्यामुळे आता महापालिकेचा दरवर्षी ३४० कोटींचा कर बुडणार आहे. मुंबईमध्ये ५०० चौरस फुटांचे जवळपास १५ लाख घरे आहेत. ज्यामध्ये २८ लाख कुटुंब राहतात. या कुटुंबांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
- तुम्ही हर्बल वनस्पती किंवा क्रुझ पार्टीत ड्रग्ज घेऊन तर…; मुनगंटीवारांचा पवार, परबांवर निशाणा
- जिल्हा बँक निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सोशल मीडियावर ‘त्या’ मिमची जोरदार चर्चा
- ‘विना प्रमुखाचं हे राज्य कसं चालेल’; रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
- ‘बळीराजाचा विकास आणि उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी मोदी सरकार कटीबद्ध’
- म्हाडाच्या रद्द झालेल्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, या तारखेला होणार परीक्षा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
