मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी नव्या वर्षानिमित्त १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांचा हप्ता वर्ग करण्याची घोषणा केली आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. यावर भाजप नेते केशव उपाध्ये(Keshav Upadhye) यांनी ट्विट करत मोदींचे आभार मानले आहे.
यासंदर्भात ट्विट करत केशव उपाध्ये म्हणाले आहेत की,’नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी १० कोटींहून अधिक अन्नदात्या शेतक-यांच्या खात्यात २० हजार कोटींची रक्कम थेट जमा करत मोदी सरकारने बळीराजाप्रती वचनबद्धता पुन्हा सिद्ध केली आहे. या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या दहाव्या हप्त्यासोबतच ३५१ एफपीओंना १४ कोटी रुपयांहून अधिक रक्कमही जारी केली आहे. याचा १.२४ लाखाहून जास्त शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. बळीराजाचा विकास आणि उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी मोदी सरकार कटीबद्ध आहे’, असे ते म्हणाले आहेत.
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी १० कोटींहून अधिक अन्नदात्या शेतक-यांच्या खात्यात २० हजार कोटींची रक्कम थेट जमा करत @narendramodi सरकारने बळीराजाप्रती वचनबद्धता पुन्हा सिद्ध केली आहे. या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या दहाव्या हप्त्यासोबतच 1/2 pic.twitter.com/URP0at7bbs
— Keshav Upadhye (@keshavupadhye) January 1, 2022
दरम्यान, यासंदर्भात ट्विट करत पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, ‘नववर्ष, २०२२ चा पहिला दिवस देशातील अन्नदात्यांना समर्पित राहील. दुपारी १२:३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीएम-किसानचा १० वा हप्ता जारी करण्याचे भाग्य लाभेल. याअंतर्गत २० हजार कोटी रुपयांच्या हस्तांतरणामुळे १० कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांना फायदा होणार आहे.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कोरेगाव भीमाचा इतिहास महाराष्ट्राच्या त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास आहे’
- आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया- मुख्यमंत्री ठाकरे
- ‘या सरत्या वर्षातील नकारात्मकता मागे सारून भविष्यकाळात नव्या उमेदीने जगण्याचा संकल्प करूया’
- ‘…तर कठोर निर्बंध लागू करणार’, अजित पवारांचा इशारा
- ठाकरे सरकारने ‘भ्रष्टाचार युक्त महाराष्ट्र’ केले आपण ‘भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र’ करूया- किरीट सोमय्या


