Share

जालन्यात सुसाट वाहनांमुळे नागरिक त्रस्त; टवाळखोर वाहनचालकांवर कारवाईची मागणी

Published On: 

जालना: शहरात मुख्य रस्त्यावर तसेच गल्ली बोळात गर्दीतुन सुसाट व बेपर्वाहपणे वाहने चालवणाऱ्यांची संख्या दिवसे न दिवस वाढतच चालली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर विशेष करून बस स्थानक ते भोकरदन नाक्यापर्यंत रात्रीच्यावेळी काही टवाळखोर सुसाट वेगाने कर्णकर्कश हॉर्नचा आवाज करीत गाड्या पळवितात. या ठिकाणी अनेक वाहनधारक सुसाटवेगाने वाहने चालवत असल्याने नागरीकांना, लहानमुलानां व महिलांना जिव मुठीत घेउन चालावे लागत आहे.

आता कोरोनामुळे रस्त्यांवर फारशी गर्दी राहत नसल्याने हे दुचाकीधारक सुसाट वेगाने गाड्या पळवतांना दिसतात. अशा विनापरवाना वाहनधारकांवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरीकांनी केली आहे. सुसाट वाहने पळविणाऱ्यांमध्ये काही हौशी तरूणांसह अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. वाहने चालवितांना ही मुले धावत्या वाहनावरच स्टंटबाजी करतात. यातील अनेकांकडे वाहन चालवण्याचा परवाना देखील नाही. त्यामुळे अनेक वेळा शहरात छोटे मोठे अपघात होतात.

वाहनधारकात कुठलीच शिस्त राहीली नसुन अनेक वेळा भरधाव वेगाने चालतांना एखाद्याला धक्का लागुन वाद निर्माण होतो. जड वाहनामुळे शहरात अनेकवेळा वाहतुकही ठप्प झालेली दिसते. मुख्य रस्त्यावरच अनेक फळ विक्रेते व भाजीपाला गाडीवाले बस्तान मांडतात. या परीसरात नेहमी वाहतुकीचा खोळंबा होतांना दिसतो. याकडे वाहतुक विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याच्या संतप्त प्रतिक्रीया नागरीकांनी व्यक्त केल्या आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!