🕒 1 min read
मुंबई : ६ जून रोजी मुंबई पोलीस आयुक्तांनी पॉक्सो संदर्भात मोठा निर्णय घेतला. यापुढे पॉक्सो किंवा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यापूर्वी डीसीपी किवा एसीपी अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी हा निर्णय घेतला आहे.
जुन्या वादातून, मालमत्तेच्या वादातून पोलिस ठाण्यात पॉक्सो किंवा विनयभंगाच्या तक्रारी दाखल होतात आणि अनेकदा आरोपी निर्दोष असतो. याच्या अनुशंगान हा निर्णय घेण्यात आला असल्याचं स्पष्टीकरण संजय पांडे यांनी दिल होत. मात्र या निर्णयाला भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी विरोध केला आहे. या संदर्भात त्या आज पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
“कायद्याचे अभ्यासक असलेले गृहमंत्री या मुद्द्यावर गप्प का?” या त्यांच्या प्रश्नाला गृहमंत्री काय उत्तर देणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
