🕒 1 min read
मुंबई : हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा काही जणांचा डाव असून मनसेच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप हे करीत आहे. महाराष्ट्रातील काकड आरत्या यानिमित्ताने बंद झाल्या. हे हिंदूंचे नुकसान आहे. मनसेचा हिंदू-हिंदू मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. मात्र, हिंदूंनी आता संयम राखावा, असे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. दरम्यान, राऊतांच्या या वक्तव्यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली आहे.
यासंदर्भात चित्रा वाघ यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की,‘हिंदूंना संयमाचे धडे देणारे हेच का ते तुमचे न सोडलेले ज्वलंत हिंदुत्व..?’, असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.
हिंदूंना संयमाचे धडे देणारे हेच का ते तुमचे न सोडलेले ज्वलंत हिंदुत्व..? pic.twitter.com/5Gn85GHJHb
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 4, 2022
दरम्यान, ‘भाजपला जी गोष्ट करणे शक्य होत नाही. ती गोष्ट ते छोट्या पक्षांच्या माध्यमातून करतात. छोट्या पक्षांचा भाजप सातत्याने बळी देते. तसेच आता हिंदूंमध्ये फूट पाडून भाजपने राज ठाकरे यांचाही बळी दिला आहे’, असेही संजय राऊत काल (४ मे) प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- “प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राचा अपमान शोधणाऱ्या शिवसेनेच्या…”, मनसुख हिरेन प्रकरणावरून केशव उपाध्ये यांची टीका
- “…क्षितिजावर पोहचणे हे येड्या गबाळ्याचे काम नाही”, मनीषा कायंदेंचा फडणवीसांवर निशाणा
- “MNS नंतर शिवसेना सभा घेणार असेल तर AIMIM…”, इम्तियाज जलील यांचा इशारा
- “आली रे आली महाचोरांच्या आघाडीला केराची टोपली…”, सदाभाऊ खोत यांचे टीकास्त्र
- “धर्माचा कुणी राजकीय बाजार भरवत असेल तर…”, रोहित पवारांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
