औरंगाबाद : शेतातले काम अवरल्या नंतर वडलंसह घरी जात असताना रस्त्यात बैलगाडी उलटल्यने चार वर्षीय चिमुरडी जखमी झाल्याची घटना सोमवार ता.३१ आठच्या सुमारास घडली.दरम्यान घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना मुलीचा (ता.१) मृत्यू झाला.याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तनुजा विकास चव्हाण वय ४ (रा. रहाडपट्टी तांडा ता. जि. औरंगाबाद) असे मृत मुलीचे नाव आहे.दरम्यान विकास चव्हाण हे शेतातील काम अवरून सोमवार ता.३१ आठ वाजेच्य सुमारास नकटेकर शीवरातून बैलगाडीने घरी येत असताना रस्त्यात बैलगाडी उलटली.यामध्ये सर्वच बैलगाडीतून खाली पडले.
यामध्ये तनुजाला मारलागल्याने ती जखमी झाली.दरम्यान तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.उपचार सुरू असताना मंगळवार (ता.१) तनुजाचा मृत्यू झाला.प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस जमादार मोहनसिंग कायटे हे पोलिस करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- संजय राऊतांच ‘ते’ आमंत्रण आम्ही स्वीकारतो; आशिष शेलारांच्या विधानाने उत्सुकता वाढली
- ऱ्हदयद्रावक! मायलेकीसह पुतणीचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू
- अजब ! 5G याचिकेवरील सुनावणीवेळी जुही चावला लागल्या गाणी गायला, कामकाजात आणले व्यत्यय
- एकच धून…६ जून ! शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्य होण्यासाठी संभाजीराजेंनी जाहीर केली लिंक
- ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतले ‘हे’ तीन मोठे निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

