बीड : महाविकास आघाडी सरकारवर एकदा ही टीकेची संधी न सोडणारे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर देवेंद्र फडणवीस ते काल जळगावच्या दौऱ्यावर होते. त्यांनी मुक्ताईनगरमधून आपल्या जळगावच्या दौऱ्याला सुरुवात केल्यानंतर भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसेंच्या घरी भेट दिली. यावेळी ते भाजप खासदार रक्षा खडसे यांना भेटले.
दरम्यान, फडणवीसांच्या भेटीगाठींवर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ‘विरोधी पक्ष आता जमिनीवर येत आहे हे चांगलं आहे. लोकशाहीत कोणी कुणाचा शत्रू नसतो. महाराष्ट्राची हीच परंपरा आहे. ते खडसेंच्या घरी गेले, त्याचं स्वागत आहे. त्याआधी ते शरद पवारांना जाऊन भेटले. त्यांचं मार्गदर्शन घेतलं असेल. मागे आम्ही भेटून लंचही घेतलं होतं. एक दिवस ते मातोश्रीवरही येतील. कशाला धुरळा उडवता?’ असा टोला संजय राऊत यांनी फडणवीसांना लगावला आहे.
आता संजय राऊत यांच्या विधानांचा माजी मंत्री व भाजप आमदार ऍड. आशिष शेलार यांनी समाचार घेतला आहे. ‘मी सुद्धा संजय राऊतांचं ते वाक्य ऐकलंय, आजच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचं वाक्य म्हणजे आमंत्रणाचा एक प्रकार आहे. आमंत्रण स्वीकारलं आम्ही,’ असं विधान आशिष शेलार यांनी केलं आहे. त्यामुळे दोन दशकांहून अधिक काळ मित्र राहिलेल्या भाजप-शिवसेनेची एकत्रित मैत्री अनुभवणाऱ्या ‘मातोश्री’मध्ये पुन्हा या दोन्ही पक्षांचे नेते एकत्र दिसणार का ? यावरून उत्सुकता निर्माण झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतले ‘हे’ तीन मोठे निर्णय
- ‘डिसेंबरपूर्वी सर्वांचे लसीकरण, ही मोदी सरकारची लबाडीच’ ; ममता दीदींचा घणाघात
- पवारांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाहीये; आरक्षण रद्द होण्यास पवारच जबाबदार – पडळकर
- एकच धून…६ जून ! शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्य होण्यासाठी संभाजीराजेंनी जाहीर केली लिंक
- आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या बालकांच्या खात्यात राज्य सरकार ५ लाख रुपये जमा करणार !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

