🕒 1 min read
हैदराबाद : शुक्रवारी(१९ नोव्हें.)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर, शनिवारी(२० नोव्हें.)सायंकाळी हैदराबाद येथे एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव(Telangana CM K Chandrashekhar Rao) यांनी शेतकरी आंदोलनादरम्यान बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली. फक्त एवढेच नाही तर या आंदोलनातील पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत केंद्र सरकारने जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी राव म्हणाले की, ‘तेलंगणा सरकारने या मानवतावादी कार्यासाठी २२ कोटी रुपये दिले आहेत आणि शेतकरी आंदोलनाच्या नेत्यांना आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची माहिती पाठवण्याची विनंती केली. कृषी कायदा विरोधी आंदोलनात ७०० हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.’
दरम्यान, तीन वादग्रस्त कृषी कायदे मागे घेतल्याच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांचे अभिनंदन करताना राव यांनी केंद्र सरकारने शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या शेतकऱ्यांवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे. तसेच देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी येत्या संसदेच्या अधिवेशनात किमान आधारभूत किमतीबाबत विधेयक आणि कायदा आणण्याची आणि भारतीय अन्न महामंडळातर्फे वार्षिक खरेदी धोरण अगोदर लागू करण्याची मागणीही राव यांनी यावेळी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
- समीर वानखेडेंच्या विवाहाचा दाखला ट्विट करत, नवाब मलिकांच्या मुलीचा नवा दावा
- भाजपाने आतातरी हुकूमशाही बंद करावी- बाळासाहेब थोरात
- गेहलोत मंत्रिमंडळात फेरबदल; १५ मंत्री घेणार शपथ
- कोणाच्या अंगी देव येतो, निघून जातो, पण बाबासाहेबांच्या अंगी…- संजय राऊत
- ‘त्या’ सेलिब्रिटींनी आता शेतकऱ्यांचं अभिनंदन करावं- सचिन सावंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
