सातारा : महाराष्ट्र पोलीस हे नागरिकांच्या हिताचे, मालमत्तेचे रक्षण करतात. तसेच कोरोना प्रादुर्भावाच्या संकटात पोलीस हे रस्त्यांवर उतरून शासनाने घातलेल्या निर्बंधाचे पालन नागरिकांकडून करुन घेतात. पोलीसांचा ताण कमी करण्यासाठी त्यांना भौतिक सुविधा देण्यावर शासनाचा भर असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथील पोलीस ठाणे व वसाहतीचे ई-भूमीपुजन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
पोलीसांचा प्रवासाचा वेळ वाचण्यासाठी पोलीस ठाण्याच्या जवळच पोलीस कर्मचाऱ्यांची घरे असणे खूप महत्त्वाचे आहे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, पोलीसांसाठी विभागवार प्रशिक्षण केंद्र असले पाहिजे. अशा प्रशिक्षण केंद्रांमुळे पोलीसांचे शारीरिक क्षमता व मनोबल वाढण्यास चांगली मदत होते. अशा प्रशिक्षणामुळेच आज महाराष्ट्र पोलीस देशात सर्वोत्तम आहेत ते जगात सर्वोत्तम होतील, असा विश्वास व्यक्त केला. कोयनानगर येथे प्रशिक्षण केंद्र उभारण्याची मागणी होत आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीचे सादरीकरण करण्यात यावे.
कोरोनाचा मुकाबला करताना अनेक पोलीसांचे मृत्यू झाले, बरेच बाधित झाले. जे बाधित होवून बरे झाले त्यांनी तात्काळ हजर होवून आपले कर्तव्य बजावले. पोलीस विभागाला दिलासा व मनोर्धेर्य वाढविण्याचे काम राज्य शासन करीत आहे. पोलीस विभाग अहोरात्र काम करीत आहे शासन आपल्या पाठीशी खंबरीपणे उभे असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- ओबीसी आरक्षण पूर्ववत होईस्तोवर स्वस्थ बसणार नाही – देवेंद्र फडणवीस
- श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा ८ गडी राखुन विजय
- ‘क्रिश ४’ ची झाली घोषणा; ह्रतिकने केले ट्विट
- कपिल शर्माच्या ‘त्या’ कृतीवर सुमोनाने व्यक्त केला राग, म्हणाली…
- राजसच्या ‘त्या’ पोस्टने चाहत्यात उडाली खळबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

