चेन्नई : माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्याकांडातील सात प्रमुख आरोपींना ठोठावलेली आजन्म कारावासाची शिक्षा माफ करून त्यांची तत्काळ सुटका करण्याची मागणी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी गुरुवारी राष्ट्रपतींना पत्र लिहिले. २०१८ साली राज्य सरकाने केलेल्या शिफारशीचा स्वीकार करण्याची विनंती स्टॅलिन यांनी पत्राद्वारे कोविंद यांच्याकडे केली आहे.
राजीव गांधी हत्याकांडातील आरोपी तीन दशकांपासून कैदेत असून त्यांना कष्ट सहन करावे लागत असल्याने त्यांच्या सुटकेची मागणी राज्यसरकारकडून करण्यात येत आहे. बहूतांश राजकीय पक्षांकडून आरोपींची शिक्षा माफ करून त्यांची सुटका करण्याची मागणी होत आहे.
या आरोपींची सुटका व्हावी हीच तामिळनाडूच्या लोकांचीदेखील मागणी असल्याचे या पत्रात मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी नमूद केले आहे. २१ मे १९९१ मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या झाली होती. या प्रकरणी व्ही. श्रीहरण ऊर्फ मुरूगन, त्याची पत्नी नलिनी, संथन, एजी पेरारिवलन, जयाकुमार, रॉबर्ट पेयास व पी. रविचंद्रन या सात जणांना दोषी ठरण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आता राष्ट्रपती, पंतप्रधानांसाठी बेड्स राखीव ठेवण्याची गरज’, दिल्ली हायकोर्टाचे मत
- मोदी सरकार ‘ट्विटर’च्या भूमिकेवर नाराज, एकतर्फी निर्णय न घेण्याचा सल्ला
- काँग्रेस राज्यभरात देणार १११ ॲम्ब्युलन्ससह ६१ लाख मास्क, नाना पटोले यांची माहिती
- ‘म्यूकरमायकोसिसचा खर्च महात्मा फुले योजनेत समाविष्ट करा’, खंडपीठाचे सरकारला आदेश
- सातव कुटुंबीयांच्या सांत्वनास राहुल गांधी हिंगोलीला येणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

