मुंबई : रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोप अद्यापही सुरूच आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असून या विरोधात एनआयए आणि ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री तसेच महाविकास आघाडीतील मंत्री अशोक चव्हाण यांनी केली होती. त्याला उत्तर देतांना भाजप नेते प्रसाद लाड यांनीही तशी मागणी मुख्यमंत्री तसेच केंद्रीय गृहमंत्र्यांना केली आहे.
या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. यामध्ये त्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीमधील प्रमुख मंत्री अशोक चव्हाण यांच्या मागणीची दखल तर मुख्यमंत्र्यांनी घ्यावी असे लाड यांनी म्हटले आहे. अशोक चव्हाण यांच्या मागणीचे स्वागत करतो आणि तशी चौकशी करण्याची विनंती करतो, असेही लाड म्हणाले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि मविआ सरकारचे मंत्री @AshokChavanINC जी यांनी रेमडेसिवीरचा होणारा काळाबाजार आणि साठेबाजी याची #NIA आणि ED मार्फत चौकशी होणे गरजेचे आहे अशी मागणी केली. याचे मी स्वागत करतो यासंदर्भात आज @CMOMaharashtra तसेच देशाचे गृहमंत्री @AmitShah जी यांना pic.twitter.com/i0MgFm4c4z
— Prasad Lad (@PrasadLadInd) April 20, 2021
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीच स्थानिक पोलिसांकडून चौकशी न करता थेट केंद्रीय संस्थेमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यावरुन हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी एनआयए, ईडी आणि सिबीआय मार्फत करण्यात यावी अशी मागणी लाड यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ऑक्सिजनसाठी उद्योग वाट पाहू शकतात, पण रुग्ण नाही’, कोर्टाने केंद्राला सुनावले
- लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक वाहतूकही होणार बंद ? ;छगन भुजबळांचे संकेत
- सोन्याची वाटचाल पुन्हा ५० हजाराच्या दिशेने!
- धार्मिक स्थळांच्या हाॅलचा उपयोग कोरोना रुग्णांसाठी करावा! रिपब्लिकन पार्टीची मुख्यमंत्र्याकडे मागणी
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या करणार कडक लॉकडाऊनची घोषणा


