मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडायची असेल तर कडक लॉकडाऊन लागू करणे महत्वाचे आहे. त्यामुळेच राज्यात कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचा निर्णय झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज बोलवण्यात आली होती. कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेतला गेला आहे.
यामध्ये बैठकीमध्ये महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लावण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. याबाबतची नियमावली काही तासातच सरकार जाहीर करणार असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिलेली आहे. तर उद्या रात्री ८ वाजल्यापासून हा कडक लॉकडाऊन लागू करावा अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या बैठकीमध्ये केलेली आहे.
तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या कडक लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक वाहतूकही होऊ शकते अशी शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, गर्दी कमी होत नसल्याने राज्य शासनाने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. किराणा दुकान, भाजीपाला, फळविक्री, दूध विक्री दुकान (डेअरी), चिकन, मटण, मासे विक्री, खासगी वाहनांसाठी पेट्रोल पंप, कृषी संबंधित सेवा, पशुखाद्याची विक्री करणारी दुकानं सकाळी 7 ते 11 याच वेळेत खुली राहतील.सकाळी 11 वाजता दुकाने बंद झाल्यानंतर रात्री 8 वाजेपर्यंत या दुकानांद्वारे घरपोच सुविधेला मात्र परवानगी असेल असं सरकारने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. नव्या नियमावलीनुसार धार्मिक स्थळं, आठवडी बाजार, दारुची दुकानं, सर्व खासगी कार्यालये, सलून, ब्यूटी पार्लर, चहाची टपरी, स्टेडियम, मैदाने, सिनेमागृह, नाट्यगृह, कोचिंग क्लासेस पूर्णत: बंद राहतील. या आदेशाची अंमलबजावणी 20 एप्रिलच्या रात्री 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सोन्याची वाटचाल पुन्हा ५० हजाराच्या दिशेने!
- प्रकाश पर्वानिमीत्त केंद्र सरकारकडे केली १०० कोटी रुपये द्या ; नांदेड गुरुव्दाराच्या अध्यक्षांची मागणी
- मोठी बातमी : दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
- ‘साहेब, कोंबड्या अंडी देत नाहीत’; पोल्ट्री चालकाची पोलिसांत तक्रार
- भारतीय नौदलाची धडक कारवाई, तब्बल 3000 कोटी रूपयांचे अंमली पदार्थ केले जप्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

