अहमदनगर – कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नागरिक गर्दी करताना दिसत आहेत. या गर्दी करणाऱ्या नागरिकांवर प्रशासनाकडून कारवाई देखील करण्यात येत आहे. काही जाणकार तर तिसऱ्या लाटेची देखील शक्यता वर्तवत आहेत. या पार्श्वभूमीवर केवळ नागरिकांनीच नव्हे तर राज्यकर्त्यांनी देखील गर्दी करण्याचं टाळायला पाहिजे मात्र तसे होताना दिसत नसल्याचे चित्र आहे.
आज रोहित पवार यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर अहमदनगरच्या खर्डा येथील ऐतिहासिक शिवपट्टण किल्ल्यासमोर ‘स्वराज्य ध्वजाची’ स्थापना केली आहे. हा देशातील सर्वांत उंच भगवा ध्वज असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार सर्वांपर्यंत पोहोचावा या संकल्पनेतून रोहित पवार यांनी या ध्वजाची स्थापना केल्याचं सांगितलं जातं आहे.मात्र या कार्यक्रमाला मोठ्याप्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले आहे.
संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन सामान्य लोकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत असताना दुसऱ्या बाजूला सत्ताधारी नेतेच अशापद्धतीने गर्दी जमवताना दिसून येत आहेत. आज झालेल्या रोहित पवार यांच्या कार्यक्रमाला अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली मात्र ना नेत्यांनी कोरोनाचे नियम पाळले ना कार्यकर्त्यांनी. त्यामुळे आता सर्वसामान्य जनतेवर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने कारवाई करणारे प्रशासन आता रोहित पवार यांच्यासह आयोजकांवर नेमकी काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाविकास आघाडीत शिवसेनेसारखा हिंदुत्वाचा पाठीराखा पक्ष सामील झाल्याने भाजपचा बुरखाच फाटला’
- खरकटं उष्ट खाणाऱ्या, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान; संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य
- मुख्यमंत्री पातळीवर रात्रीतून मोठ्या हालचाली, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील अडथळे केले दूर
- किरीट सोमय्यांनी घेतली करमुसेंची भेट, आव्हाडांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता
- महाविकासआघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली – स्वाभिमानी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
