Share

राजकीय दुकानदारी बंद होण्याच्या भीतीमुळे मुख्यमंत्र्यांचा कृषी कायद्यांना विरोध- फडणवीस

Published On: 

🕒 1 min read

इस्लामपूर:- गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

कॉंग्रेस व समविचारी पक्ष शेतकरीविरोधी भूमिका घेत आहेत. जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. केंद्राने केलेले कायदे हे शेतकऱ्यांना बाजाराचे मालक बनवणारे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही शेतकऱ्यांविरोधात निर्णय घेणार नाहीत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. शेतकरी हिताचा निर्णय झाल्यावर राजकीय भूमिका का आडव्या येतात हे समजत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आधी हे कायदे चांगले असल्याचा अध्यादेश काढला. नंतर राजकारण सुरू झाल्यावर राजकीय दुकानदारी बंद होईल, या भीतीने तो मागे घेतला. त्यावरून कोण शेतकरीहित पाहत आहे हे दिसते.

दरम्यान, नवीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ पंजाब, हरियाणा येथील शेतकरी गेल्या चार आठवड्यांपासून दिल्लीच्या सीमेवर निदर्शने करीत आहेत. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, परंतु सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये एकमत झाले नाही. शेतकरी तिन्ही कायदे रद्द करण्यावर ठाम आहेत. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले की, आम्ही पंजाबच्या शेतकरी संघटनांसह देशातील अनेक शेतकरी संघटनांशी चर्चा करीत आहोत आणि लवकरच यावर तोडगा निघू शकेल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!