मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची प्रकृती बरी नसल्याने ते काही दिवसांपासून बाहेर कुठे येत नाहीत. त्याच सोबत हिवाळी अधिवेशन झाले तेव्हा देखील मुख्यमंत्री उपस्थित नव्हते. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती. या बैठकीला देखील उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते. त्यामुळे भाजप नेते मुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत.
भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत म्हणलं होतं, संकटाच्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेऊन काम करणे अपेक्षित आहे. त्यांच्या वतीने कोणी मुख्यमंत्री म्हणून काम करावे हे ठरविण्याचा त्यांचा अधिकार आहे. आपण मुख्यमंत्र्यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना करतो. पण तब्येत बरी होईपर्यंत त्यांनी अन्य नेत्याकडे पदभार सोपवावा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
हे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे की मुंबईचे… pic.twitter.com/s3XBDQkA0c
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 14, 2022
आता भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रकृतीच्या कारणामुळे देशाच्या पंतप्रधानांनी बोलाविलेल्या महत्वाच्या बैठकीला गुरूवारी दांडी मारणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महापालिकेच्या बैठकीला उपस्थित राहतात याबाबत आश्यर्य व्यक्त करून हे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत की मुंबईचे असा प्रश्न भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ठाकरेंवर चंद्रकांत पाटलांनी केलेल्या टीकेला जयंत पाटलांचे थेट उत्तर, म्हणाले…
- मोठी बातमी! सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरच्या अपघाताचे कारण आले समोर
- इंदूरीकर महाराजांच्या ‘त्या’ वक्तव्यावर डॉ. दाभोलकर म्हणाले, वारकरी संप्रदायाच्या नावावर…
- ‘कामावर रुजू झाल्यास कारवाई मागे घेणार का?’; एसटीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले…
- सरसकट मालमत्ता कर माफ करा; आशिष शेलारांची स्वाक्षरी मोहीम


