🕒 1 min read
मुंबई : मुंबईत भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणी बैठक पार पडली. यावेळी राज्यात ओबीसी जागर अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करतानाच मंत्री छगन भुजबळ यांना खुलं आव्हान दिलं आहे. भुजबळांनी कोल्हापुरातल्या बिंदू चौकात फडणवीसांसोबत चर्चेसाठी यावं, म्हणजे दूध का दूध आणि पानी का पानी होईल असं पाटील म्हणाले.
‘छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार हे सरकारमधील दोन मंत्री लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करत आहेत. ओबीसी आरक्षणाबद्दल भाजपच्या मनात खोट नाही. छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणावर कोल्हापूरच्या बिंदू चौकात येऊन देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करावी. म्हणजे दूध का दूध आणि पानी का पानी होईल,’ असं भाष्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
तर, ‘राज्य सरकारच्या वेळकाढूपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले आहे. ओबीसी आरक्षण संपवण्याचे काम या सरकारने केले आहे. या मुद्द्यावर खोटे बोल पण रेटून बोल या पद्धतीने कारभार चालला आहे. आपली चूक झाली हे माहीत असल्याने सध्या महाविकास आघाडीचे नेते कमी बोलत आहेत आणि त्यांचे बोलके पोपट जास्त बोलत आहेत. मालक जसे सांगतात तसे हे पोपट बोलतात,’ अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ठाकरे सरकारमध्ये नेते कमी अन् बोलके पोपटच जास्त’, ओबीसी आरक्षणावरून फडणवीसांचा टोला
- ओबीसींना संघटित करून अधिक सक्षम करणे हेच आपले अंतिम ध्येय-देवेंद्र फडणवीस
- ‘देशमुखांचे वय झालेय, त्यांना आता लपाछपीचा खेळ झेपणार नाही’, अतुल भातखळरांचा टोला
- कोणीही विरोध केला तरी माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे हेच घेणार-संजय राठोड
- ‘पेगासस’साठी एवढा निधी आला कोठून? की त्यातही नवीन कांड आहे?; आव्हाडांचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
