Share

“इंदिरा गांधी पंतप्रधान असताना…”; बाळासाहेब ठाकरे, शरद पवारांचे उदाहरण देत भुजबळांनी टोचले पटोलेंचे कान

Published On: 

मुंबई : गावगुंड मोदी प्रकरणानंतर पुन्हा एका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं ,असं नाना पटोले म्हणाले आहेत. यावरुन भाजपाकडून राज्यभरात आंदोलनं केली जात आहे. भाजप नेते पटोलेंवर हल्लाबोल करत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रसचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी नाना पटोले यांचे कान टोचले आहे आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांचे उदाहरण देत छगन भुजबळ यांनी पटोलेंवर निशाणा साधला. बाळासाहेब सांगायचे पंतप्रधानांचा मान राखलाच गेला पाहीजे. केंद्रीय मंत्री असताना शरद पवारांनी मुख्यमंत्र्याचा मान राखला होता, याची आठवण छगन भुजबळ यांनी करुन दिली.

छगन भुजबळ म्हणाले, “इंदिरा गांधी पंतप्रधान असताना शिवसेना आणि त्यांचे जोरात भांडण व्हायचे. पण बाळासाहेबांनी सांगितले होते की त्यांचा कुठेही अपमान होता कामा नये, राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांचा मान आपण राखला पाहीजे. शरद पवार केंद्रात मंत्री असताना एका कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख थोडे उशीरा आले होते. ते व्यासपीठावर आल्याबरोबर शरद पवार उठून उभे राहीले. कारण तो त्या खुर्चीचा मान आहे.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!