🕒 1 min read
मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णसंख्या घटल्याने ठाकरे सरकारने (big decision of Thackeray government) लागू केलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यात आले आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या डोसचे प्रमाण ९० टक्के आणि दुसऱ्या डोस घेणाऱ्यांचे ७० टक्के आहे तसेच १५ ते १८ वयोगटातील मुलांचं राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाणे लसीकरण झालं आहे, अशा जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यानुसार लग्नसमारंभासाठीच्या निर्बंधातही बदल करण्यात आले आहेत.
दरम्यान आता ९० टक्के लसीकरण झालेल्या ११ जिल्ह्यांत लग्नसमारंभासाठी २०० जणांना परवानगी देण्यात आली आहे.( 200 people allowed for wedding ceremonies in 11 districts) त्यानुसार मुंबई, पुणे, भंडारा,गोंदिया, चंद्रपूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे लग्नसराईमध्ये आता २०० जण सहभागी होऊ शकतात.
दरम्यान आजपासून एस्सल वर्ल्डसारखे पार्क ५० टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. तसेच स्विमिंग पूल,वॉटर पार्क, सलून, स्पा, रेस्टॉरंट, थिएटर, नाट्यगृह, भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांना ५० टक्के उपस्थितीत परवानगी देण्यात अली आहे. तसेच आजपासून पर्यटन स्थळांनाही पुन्हा परवानगी देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘…योद्धा ये महान हैं’, शरद पवार कोरोनामुक्त होताच राष्ट्रवादीने दिल्या अनोख्या शुभेच्छा
- राज्यातील कोरोना रुग्णसंख्या घटल्याने निर्बंध शिथील; काय सुरु काय बंद, वाचा सविस्तर!
- “..खाऊ भाईजानला कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढला पाहिजे”, रुपाली पाटील आक्रमक
- अफवा पसरवणाऱ्या ‘हिंदुस्थानी भाऊ’ला अटक; आज कोर्टात हजर करण्याची शक्यता
- विद्यार्थ्यांची माथी भडकवणारा ‘हिंदुस्थानी भाऊ’ नेमका आहे तरी कोण? जाणून घ्या सर्वकाही!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
