🕒 1 min read
मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. अवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले आहे. या निर्णयावर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘जिल्ह्यात अवैध दारु मोठ्या प्रमाणावर वाढली होती. लहान बालके, महिला अवैध दारुच्या धंद्यात उतरले होते. तरुण वर्ग अमली पदार्थाच्या आहारी जात होते. त्यामुळं क्राईम वाढले होते. दारू बंदी होताच अवैध दारू सुरू झाली होती. मागील सरकार ने दारू बंदी केली मात्र अंमलबजावणी करू शकले नाही, आंध्र, तेलंगणा आणि अवतीभवतीच्या जिल्ह्यातून दारू येत होती. समितीच्या अहवालानुसार दारू बंदी उठविली आहे.’ असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.
जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात समिती स्थापन केली होती. अडीच लाख निवेदन दारू बंदी उठवा असे तर 30 हजार दारू बंदी कायम ठेवा या मागणीसाठी आली होती. त्यानंतर पुन्हा एक समिती स्थापन केली होती. जिल्ह्यात क्राईम वाढले होते. महिलांवर गुन्हे दाखल झाले होते. जनतेच्या सर्व घटकांसोबत बोलून झा समितीने अहवाल दिला होता. त्यानुसार दारू बंदी उठविली आहे, असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.
तर, झा समितीने अहवाल दिला, त्या आधारे मुख्यमंत्र्यांनी तो विषय कॅबिनेटमध्ये मांडला. महिला, मुले क्राईममध्ये अडकत होते. दारू माफिया बळकट झाला होता. तालुका- जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव पाडत होता. त्यामुळे दारू बंदी हटविणे गरजेचे होते. दारू बंदी हटवताना सामाजिक कार्यकर्त्यांशी झा समिती बोलली का? या बद्दल मला माहिती नाही आणि गडचिरोली जिल्ह्यात कोणते मोठे सामाजिक कार्यकर्ते आहेत मला माहित नाही, असा टोला देखील वडेट्टीवार यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मराठा आरक्षणाबाबत भाजपचा कळवळा फक्त दिखावा’, अशोक चव्हाणांची टीका
- ‘शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे जिवलग मित्र होते; माझ्यात आणि राज मध्येही कॉमन पॉईंट !’
- अमेरिकन गुप्तहेर संस्था शोधून काढणार कोरोनाचा नेमका उगम कुठे झाला?
- ‘त्या’ व्हिडीओ मधील मारहाण करणाऱ्यांची होणार चौकशी – पोलिस अधीक्षक विनायक देशमुख
- मोठी बातमी : राज्यात सरसकट लॉकडाऊन उठणार नाहीच – आरोग्यमंत्री राजेश टोपे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
