Share

‘सत्तेबाहेर असलो तरी आम्हीच…’; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला टोला

Published On: 

मुंबई: सध्या राज्यात निवडणुका आणि मतदानानंतर आलेल्या निकलामुळे राजकीय वर्तुळात चांगलंच उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे. गोंदिया, भंडाऱ्यात भाजपचा दबदबा दिसून आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. तसेच पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवसेनेला चांगलेच चिमटे काढले आहेत.

चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यातील नगरपालिका – नगरपंचायती तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक जागा मिळविल्या असून पुन्हा एकदा ‘भाजपाच नंबर वन’ हे सिद्ध झाले आहे, असं पाटील यावेळी म्हणाले आहेत. पक्षाचे संघटन मजबूत असल्याने हे यश मिळाले आहे, असंही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, गेले २६ महिने भाजपा राज्यात सत्तेबाहेर आहे तरीही पक्षाचे संघटन मजबूत आहे. भाजपाच्या नेते – कार्यकर्त्यांची एकजूट आहे. त्यामुळे पक्षाला निवडणुकीत यश मिळाले आहे. सत्ताधारी आघाडीमध्ये बेबनाव आहे. त्यांच्यात समन्वय नाही. कोरोनाचा सामना करणे आणि राज्यात विकासकामे करण्यापेक्षा आघाडीचे नेते कमाईमध्ये गुंतले आहेत. जनता या प्रकाराला कंटाळली आहे. जनतेची नाराजी नगरपालिका – नगर पंचायतींच्या निकालात दिसली, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!