Share

आता उद्धव ठाकरेंचे पाय जमिनीवर आले, आनंद आहे; चंद्रकांत पाटलांचा टोला

Published On: 

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकण दौऱ्यावर आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करतोय, असा टोला उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकणात दाखल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी कोणत्या निकषानुसार मदत करायची हे आढावा घेतल्यानंतर ठरवलं जाईल असं स्पष्ट केलं.

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावर भाजप नेत्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील खोचक शब्दात टीकास्त्र सोडलं आहे. ‘सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे हे दीड वर्षांनी बाहेर पडले. तुमचे पाय सरकार आल्यापासून वर हवेत गेले आहेत. ते आता जमिनीवर येत आहेत, त्याबद्दल आनंद आहे,’ असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

फोटोसेशनसाठी आलेलो नाही, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला !

आपण फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही. तर, मी कोकणवासीयांना योग्य मदत देणारच. मी विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी आलेलो नाही, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!