🕒 1 min read
मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणावरून चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारने पोलीस बळाचा चुकीचा वापर करत राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र पोलिसांची बदनामी केली असल्याचे म्हटले आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांच्या भ्रष्टाचारांच्या मालिका संपता संपत नाहीत. देशोधडीला लागलेल्या देशमुखांवर पुन्हा एकदा करण्यात आलेले आरोप हे त्यांनी भ्रष्टाचार आणि मनमानी कारभाराची सीमा कितपत गाठली होती, हे दाखवून देतात. राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी अनिल देशमुखांवर पोलीस आणि विशिष्ट पदांवरील अधिकाऱ्यांच्या बदलीची अनधिकृत यादी पाठवत असल्याचा आरोप केला आहे. जो माणूस १०० कोटींची वसुली करू शकतो, तो काहीही करू शकतो, यात शंकाच नाही.
त्यामुळे ठाकरे सरकारने पोलीस बळाचा चुकीचा वापर करत राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र पोलिसांची बदनामीही केली. त्यामुळे या सरकारच्या भ्रष्ट मंत्र्यांचं पितळ उघडं पडत आहे. आपल्या पदाचा गैरवापर करून बेहिशेब संपत्ती गोळा करणाऱ्या देशमुखांना आणि अशा सर्व मंत्र्यांना चपराक बसणं गरजेचं आहे.असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- अन्य राज्यात काही असो परंतु महाराष्ट्राची संस्कृती अशी नाही- रावसाहेब दानवे
- “….बाबत चंद्रकांत पाटलांनी इतकं हळवं होण्याची गरज नाही”, हसन मुश्रीफांचा खोचक टोला
- अजित पवारांच्या वक्तव्यावर रावसाहेब दानवेंची टीका; म्हणाले,‘महिलाही पिल्या तरी…’
- आता राशिद खानवरही चढला पुष्पाचा फिवर; VIDEO शेअर करत म्हणाला, “फायर है में!”
- “सत्ता टिकवण्यासाठी आणि काँग्रेसचे लांगूलचालन करण्यासाठी शिवसेना भूमिका घेत नाही”, ‘त्या’ प्रकरणावरून दरेकरांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
