Share

जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांची टीका; म्हणाले,“…ये डर होना जरुरी है”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यातील मविआ नेत्यांवर होत असलेल्या ईडी कारवाईची राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी चांगलाच धसका घेतल्याचे दिसत आहे. ते म्हणाले की, “उद्या ‘ईडी’ने माझ्या मुलीला चौकशीला बोलावले तर ती आत्महत्या करेल तसेच महाविकास आघाडी घ्यायचा तो निर्णय घेईल पण मला विचाराल तर आता मी माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही.” यावरून आता भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी टीका केली आहे.

यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘आपल्या कुकर्मांमुळे कधीतरी आपल्यावर कारवाई होईल या भीतीने काही जण आत्ताच आत्महत्येची धमकी देऊ लागलेत. ईमानदारी और सच्चाई का ये डर अच्छा है…ये डर होना जरुरी है’, असे पाटील म्हणाले.

दरम्यान, राज्य सरकारकडून भाजप नेत्यांची चौकशी सुरु असली तरी कोणालाही तुरुंगात टाकले आहे का? चौकशी करणे आणि धाडी टाकणे यामध्ये फरक आहे. पण आता केंद्रीय यंत्रणा थेट घरात घुसल्या आहेत. यावर महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते चर्चा करतील. पण मी माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!