मुंबई: राज्यात सध्या विविध भागात पाउसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे अनेकाना पाऊसामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र नुकतेच आता हवामान विभागाकडून येत्या तीन ते चार दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याचे वर्तवण्यात आले आहे.
मुंबईसह ठाण्यातही जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. याबाबत ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी ट्विट करून मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे.
पुढचे 3, ४ दिवस कोकणांत मुसळधार पावसाची शक्यता, मुंबई ठाणे मध्ये पण.
मध्य महाराष्ट्र व विदर्भात हिhttps://t.co/eAIy8vzk7ehttps://t.co/VGQVXMkDHe
IMD pic.twitter.com/saVWVKjiW9— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 16, 2021
राज्यात मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं मुंबईकरांसह कोकणवासियांना पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतः ची काळजी घेत आपल्या कामाचे नियोजन करायला हवे. तसेच यात गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाच्या सरी कोसळण्यास सुरु झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अश्विन आणि जाडेजा या दोघांनाही खेळवावे’ : सुनील गावस्कर
- दोन आठवड्यात मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये उभा राहणार ऑक्सिजन प्लांट!
- ‘….तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावेच लागेल’
- दानवे म्हणाले, ‘संजय राऊत चावी दिल्यावर बोलतात’; आता राऊतांच सडेतोड प्रत्युत्तर !
- काळी, सफेद, पिवळ्या बुरशीनंतर आता ‘या’ राज्यात हिरव्या बुरशीचा रुग्ण


