Share

सीईटी रद्द ; अकरावी प्रवेशासाठी औरंगाबादेतील महाविद्यालय गजबजले!

Published On: 

औरंगाबाद : अकरावी प्रवेशासाठी सीईटी प्रवेश परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने हा निकाल दिला. दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेशासाठी २१ ऑगस्ट रोजी सीईटी परीक्षा नियोजित होती. हायकोर्टाने सर्व बाजू ऐकल्यानंतर प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सीईटी रद्द करण्याचा निर्णय आदेश हायकोर्टाने दिल्यानंतर बुधवारपासून विद्यार्थ्यांनी व पालकांनी महाविद्यालय प्रवेशासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.

महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांची नोंदणी करून घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विषयनिहाय केलेले गुणदान आणि मंडळाच्या धोरणानुसार देय असलेल्या सवलतीच्या गुणांचा लाभ प्रचलित पद्धतीनुसार देऊन मंडळाने त्याचे सर्व निकष विचारात घेऊन दहावीचा निकाल लावला. अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

मात्र मंगळवारी हायकोर्टाने अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा रद्द केल्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांचा गैरसमज दूर झाला आहे. त्यामुळे बुधवारी अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी महाविद्यालये गाठत प्रक्रिया सुरुही केली. औरंगाबाद जिल्ह्यात अनुदानित महाविद्यालयातील प्रवेश क्षमता २८ हजार ८६० एवढी आहे. कला शाखेचे १२ हजार ८६०, वाणिज्य २ हजार ८००, विज्ञान १३ हजार २०० आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!