🕒 1 min read
नवी दिल्ली: संसदेत झालेल्या गदारोळाची चर्चा आज दिवसभर रंगली. संसदेत मार्शल रक्षकांकडून महिला खासदारांना मारहाण करण्यात आली. अशी घटना संसदेत पहिल्यांदाच घडली. असा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात आला.दरम्यान पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस गदारोळातच सुरु झाला.या आरोपानंतर विरोधकांनी सरकारविरोधात धरणे आंदोलन पुकारले. यावेळी राहुल गांधीसह एकूण १५ पक्षांचे नेते आंदोलनात उपस्थित होते. तर दुसरीकडे ८ केंद्रीय मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत हे आरोप फेटाळून लावले. यामध्ये केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, अर्जुन मेघवाल, धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, व्ही मुरलीधरन, अनुराग ठाकुर आणि प्रल्हाद जोशी यांनी पत्रकार परिषद घेतली.
People wait for their issues to be raised in Parliament. Whereas anarchy remained the Opposition's agenda. They didn't care about people, taxpayers' money. What happened was condemnable. Instead of shedding crocodile tears, they must apologise to nation: Union Min Anurag Thakur pic.twitter.com/XC8tVAsFky
— ANI (@ANI) August 12, 2021
The day before yesterday, some MPs climbed on top of the tables (in Parliament). They were feeling proud of themselves. They thought they've done something great. They tweeted after shooting its video. Video shooting is not allowed: Parliamentary Affairs Minister Pralhad Joshi pic.twitter.com/sggb9OC29i
— ANI (@ANI) August 12, 2021
????LIVE NOW????
Press Conference on conclusion of the Parliament Session
Watch on PIB's????
YouTube: https://t.co/vIHDCCwWJ9
Facebook: https://t.co/ykJcYlvi5b https://t.co/f69813sNNK— PIB India (@PIB_India) August 12, 2021
अनुराग ठाकुर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, विरोधकांना जनतेचं हित किंवा करदात्यांचा पैसा किंवा संविधानाच्या मूल्यांची कोणतीच चिंता नव्हती. जे घडलं ते खूपच लज्जास्पद होते. त्यामुळे विरोधकांनी देशाची माफी मागायला हवी. विरोधकांचे वागणे हे लाज आणणारे आणि गोंधळ माजवणारे होते असे अनुराग ठाकूर यांनी परिषदेत म्हटले आहे.
तर यावेळी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ‘आम्ही दररोज चर्चेसाठी प्रयत्न केला होता. चर्चा व्हावी असाच आमचा प्रयत्न होता. पहिल्याच दिवशी जेव्हा मंत्र्यांची ओळख करून द्यायची तेही राहून गेले. विरोधकांनी यामध्ये अडथळा आणला.आम्ही चर्चेसाठी तयार होतो. मात्र विरोधकांनी चर्चेतून पळ काढला असल्याचा आरोप प्रल्हाद जोशीयांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राज्यसभेत महिला खासदारांना मारहाण, ही लोकशाहीची हत्या’,राहुल गांधींचा आरोप
- ताटं वाजवल्यामुळेच देशात अवदसा आली; मोदी माध्यमांसमोर यायला घाबरतात – प्रणिती शिंदे
- ऐतिहासिक महेमूद दरवाजा लगतच्या अतिक्रमण धारकांना २४ तासांची मुदत
- मंत्रिमंडळ बैठकीत ठरलं ; राज्यातील हॉटेल्स, मॉल्स रात्री 10 पर्यंत सुरु राहणार
- Eng vs Ind : काही वेळातच दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात ; दोन्ही संघ ‘या’ मोठ्या बदलांसह उतरणार मैदानात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
