🕒 1 min read
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) लोकसभा व विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची खर्च मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा मतदारसंघात आधी ७० लाख रुपये खर्चाची मर्यादा होती ती वाढवून आता ९५ लाख रुपये करण्यात आली आहे. तर विधानसभा मतदारसंघात आधी २८ लाख रुपये खर्चाची मर्यादा आता ४० लाख रुपये करण्यात आली आहे. अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. आगामी निवडणुकीत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात असल्याचेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
पाच राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांपूर्वी, भारतीय निवडणूक आयोगाने गुरुवारी हा निर्णय जाहीर केला आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा निर्णय लागू करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठीची खर्चाची मर्यादा मोठ्या राज्यात ९५ लाख रुपये आणि छोट्या राज्यात ७५ लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. तर विधानसभेसाठी ही मर्यादा मोठ्या राज्यात ४० लाख आणि छोट्या राज्यात २८ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
निवडणुकीत निवडणूक आयोगाने खर्च मर्यादा घालून दिल्याने त्यापेक्षा जास्त खर्च केल्यास कारवाईची टांगती तलवार होती. त्यामुळे उमेदवारांना खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. आता या निर्णयामुळे उमेदवारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘चकदा एक्प्रेस’ चित्रपटाचा फस्ट लूक शेअर ; जाणून घ्या कोण असणार महिला क्रिकेटरच्या भूमिकेत?
- ‘मोदी ड्रामा बंद करो’; नाना पटोलेंचा पंतप्रधानांवर निशाणा
- वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा; पाकिस्तानशी होणार पुन्हा सामना!
- अभिनेत्री मेहक चहलला मिळत नाही ‘वर’ म्हणाली, “मी अरेंज मॅरेजसाठी…”
- ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला निधी मिळण्याबाबत शासन निर्णय जारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
