Share

मराठा आरक्षणासाठी केंद्र शासनाने कायदा करावा – माजी आ. हर्षवर्धन जाधव

Published On: 

औरंंगाबाद : मराठा समाजासह पाटीदार, आणि गुज्जर समाज आरक्षणासाठी केंद्र शासनाने नवीन कायदा तयार करावा अशी मागणी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी गुरूवारी (दि.२७) पत्रकार परिषदेत केली. तसेच त्यांनी यावेळी खा.संभाजीराजे यांनी आपल्या खासदारकीचा उपयोग करून केंद्रशासनावर आणि भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षावर दबाव आणावा असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची याचिका सर्वाेच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर मराठा समाजात मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली असून पुढे काय होणार अशी चिंता मराठा समाजातील प्रत्येकाला लागली आहे. मराठा समाजासह गुज्जर आणि पाटीदार समाज आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षापासून न्यायालयीन लढा देत असून त्यांना अद्यापपर्यंत आरक्षण मिळालेले नाही. मराठा समाजासह गुज्जर आणि पाटीदार समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्रसरकारने आता पुढाकार घेण्याची गरज आहे.

केंद्रशासनाने ज्या प्रमाणे कलम ३७० रद्द केले, तसेच काही राज्यांना स्वतंत्रता बहाल केली त्याप्रमाणे मराठा समाजासह गुज्जर आणि पाटीदार समाजाला आरक्षण देण्यासाठी नवीन कायदा तयार करावा अशी मागणी हर्षवर्धन जाधव यांनी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!