लखीमपुर : उत्तर प्रदेश मधील लखीमपुर खिरी मध्ये काही दिवसांपूर्वी आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना अमानुषपणे गाडीने चिरडण्याचा आरोप असणाऱ्या आशिष मिश्रा याला डेंगूची लागण झाल्याने त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्याच्या रक्तातील साखर वाढल्याने त्याची तब्येत बिघडली असून डॉक्टरांच्या पथकाने त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केले आहेत.
आशिष मिश्रा तुरुंगात असताना त्याला ताप आल्याने तसेच त्याला डेंगूची लक्षणे दिसल्याने त्याला रुग्णालयात हलवण्यात आले. लखीमपूर खिरी जिल्हा कारागृहाच्या अधीक्षकांनीही याबाबत माहिती दिली. केंद्राच्या तीन कृषी कायद्याविरुद्ध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गाडी घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न हा आशिषने केल्याचे दिसले होते. त्यामध्ये ८ लोक मरण पावले असून त्यातील ४ जन शेतकरी होते.
यावरून संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली होती. अनेकांनी भाजपा सरकारला यावरून लक्ष केले होते. तर काहींनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. महाराष्ट्रात सुद्धा या घटनेचे लोण पसरले होते. राज्यातील महाविकास आघाडी ने या घटनेच्या निषेधार्थ राज्यव्यापी आंदोलन केले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भ्रष्टाचाराचा काळोख दूर करण्याचे आव्हान आपल्याला पेलावे लागणार आहे’
- phone-pe वरून मोबाईल रिचार्ज करण्यासाठी द्यावे लागणार अधिक शुल्क
- ‘माझे वडील हिंदू आणि आई मुस्लिम…’, मलिकांच्या ‘त्या’ आरोपांवर समीर वानखेडेंचे प्रत्युत्तर
- ‘नानाभाऊ पटोलेचं आता निवडून येणार!’, भीमगायिका कडुबाईंनी गायनातून व्यक्त केल्या भावना
- उस्मानाबादेत बालविवाहाचा बळी? कमी वयात लग्न आणि मातृत्वाने तिचा जीव गेला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

