Share

समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल होणार की नाही? याबाबत गृहमंत्र्यांचंं सूचक वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अटक प्रकरणी अनेक घडामोडींना वेग आला आहे. पंच प्रभाकर साईलने केलेल्या 25 कोटींच्या खंडणीच्या आरोपामुळे प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. ‘प्रभाकर साईलने पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर गुन्हा दाखल होऊ शकेल’ असं महत्त्वाचं वक्तव्य राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. तसंच, या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली, अशी माहितीही वळसे पाटलांनी दिली.

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्यावर एकापाठोपाठ आरोपांची मालिकांचा बार लावला आहे. त्यातच पंच प्रभाकर साईलने खंडणीचा आरोप करून एकच खळबळ उडवून दिली. ‘प्रभाकर साईल याने संरक्षण मागितले होते त्यांना पोलीसांना संरक्षण दिले आहे. त्याने जे काही आरोप केले आहे ते गंभीर आहे जर प्रभाकर साईलने पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर गुन्हा दाखल होऊ शकेल, असं स्पष्टपणे दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, नवाब मलिकांनी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली होती. नवाब मलिक आणि माझी भेट झालेली नाही. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझी जुजबी चर्चा झाली, या विषयावर चर्चा झाली नाही, दुसर्‍या विषयाबाबत बैठक होती, असंही वळसे पाटलांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!