Share

कर्णधार कोहलीने सांगितले पराभवाचे कारण, म्हणाला…

Published On: 

इंग्लंड : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) विजेतेपद मिळवण्याचे विराट ब्रिगेडचे स्वप्न भंगले आहे. न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा 8 गडी राखून पराभव केला. यासह न्यूझीलंडच्या संघाने विजेतेपद मिळविले आणि विराट ब्रिगेड आयसीसी करंडक जिंकण्यात चुकला. पराभवानंतर कोहलीने याचे कारण सांगितले आहे.

सामन्यानंतर कोहली म्हणाला, पावसाच्या व्यत्ययामुळे भारतीय संघाची लय बिघडली होती. ‘पहिला दिवस पावसाने वाहून गेला आणि जेव्हा खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा लय शोधणे कठीण होते. आम्ही फक्त तीन विकेट गमावल्या, जर पाऊसाचा खेळात व्यत्यय नसता तर आम्ही आणखी धावा करू शकलो असतो.

यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसनने कोहली आणि भारतीय संघाचे कौतुक केले आहे. विल्यमसन म्हणाला, ‘मी विराट आणि भारतीय संघाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. तो एक अविश्वसनीय संघ आहे, आम्हाला माहित होतं त्यांच्या सोबतचा सामना आव्हानात्मक असेल. आमचा संघ विजय नोंदविण्यात यशस्वी झाला याचा मला आनंद आहे.

पुढे विल्यमसन म्हणाला, ‘ही खूप खास भावना आहे. आमच्या क्रिकेट इतिहासात प्रथमच आपण विश्वविजेतेपद जिंकले आहे. गेल्या दोन वर्षात आमच्या संघाशी संबंधित प्रत्येक खेळाडूने यात एक भूमिका बजावली आहे. ही एक विशेष कामगिरी आहे.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!