मुंबई : बुधवारी(१७ नोव्हें.)काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राफेल विमान खरेदी व्यवहारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी गिरगाव न्यायालयाने बजावलेले समन्स रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, त्यांच्या याचिकेवर २२ नोव्हें.ला सुनावणी होणार आहे.
याचिकेमध्ये स्थानिक न्यायालयाकडून बजावण्यात आलेले समन्स १२ जुलै २०२१ ला मिळेपर्यंत आपल्याला या तक्ररीविषयी काहीच माहीत नसल्याचा दावा राहुल यांनी केला आहे.
दरम्यान, भाजपचे कार्यकर्ते महेश श्रीमल यांनी २०१९ मध्ये राहुल यांच्याविरोधात गिरगाव न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेत गिरगाव न्यायालयाने राहुल यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. गिरगाव न्यायालयाने केलेली ही कारवाई रद्द करण्याच्या मागणीसाठी राहुल यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. तसेच याचिकेवर निर्णय देईपर्यंत गिरगाव न्यायालयाने सुरू केलेल्या कायदेशीर प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. मानहानी प्रकरणी कारवाईची मागणी केवळ बदनामी झालेली व्यक्तीच करू शकते, असेही ते याचिकेत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- देशमुखांना जेलमध्ये टाकल्याची भाजपाला किंमत चुकवावी लागेल- शरद पवार
- विदर्भातल्या मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवायला हव्या होत्या; शरद पवारांचा फडणवीसांना टोला
- ‘एखाद्या नाचीनं महात्मा गांधींवर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं’
- मलाना क्रीम घेऊन बोलल्याने बापूंचे विचार संपणार नाहीत- नवाब मलिक
- राज्याने कर कपात करून जनतेला दिलासा द्यावा; नाना पटोलेंचा सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

