Share

आमच्यावर आरोप करायला लावून केंद्र सरकारने परमबीर सिंहांना पळवून लावलं- संजय राऊत

Published On: 

मुंबई : आज(१८ नोव्हें.)माध्यमांशी संवाद साधतांना विविध मुद्द्यांवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यावेळी बोलत असतांना राऊत म्हणाले की,’ज्या व्यक्तीने राज्याच्या गृहमंत्र्यांवर भन्नाट आरोप केले आज तो बेपत्ता आहे, त्याला फरार घोषित करावं लागलं. ती व्यक्ती कुठे आहे हे कुणाला माहिती नाही. हे सगळ्यात मोठं विडंबन आहे. जर ते पळून गेले असतील तर त्यात केंद्र सरकारचा हात आहे. केंद्राच्या मदतीशिवाय कुणीही हवाई, समुद्री किंवा रस्त्याच्या मार्गाने देशाच्या सीमा पार करू शकत नाही. तुम्ही आमच्यावर आरोप करून त्यांना पळवून लावले.’

दरम्यान, अनिल बोंडे यांनी देशात ज्या राज्यात भाजपाचं सरकार आहे तिथं कुणीही दंगली करण्याचा प्रयत्न करत नाही किंवा हिंमत करत नाही. यावर भाष्य करत संजय राऊत यांनी भाजपा महाराष्ट्रात दंगली घडवण्याची हिंमत करत आहे, असे प्रत्युत्तर दिले. तसेच सरकार पाहतंय. मी त्यावर बोलणार नाही. गृहमंत्रालय त्यावर पाहिल, असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!